मंगळवार, ३० ऑगस्ट, २०११

श्री गणेशोत्सव




   भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्रीगणेशाचा जन्म झाल्यामुळे या उत्सवाचे आयोजन प्रत्येक घरात केले जाते. 'सुखकर्ता दुःखहार्ता श्रीगणेश' चतुर्थी व्रताने प्रसन्न होतो अशी श्रद्धा आहे.
   लोकमान्य टिळकांनी इ.स. १८९३ ला सार्वजनिक श्रीगणेशोत्सवाचा प्रारंभ केला. इ. स. १८९३ ला मुंबईसह महाराष्ट्रमध्ये हिंदू-मुसलमानांचे दंगे झाले तेव्हा समाजात एकात्मता निर्माण करण्यासाठी टिळकांनी हा उत्सव सुरू केला.
   अग्रपूजेचा सन्मान:- सृष्टी निर्मिती नंतर अग्रपूजेचा मान कोणाला देणार? हा प्रश्न सर्वांनी ब्रम्हदेवाला विचारला तेव्हा 'जो पृथ्विला सर्वप्रथम प्रदक्षिणा घालेल त्याला अग्रपूजेचा मान देण्यात येईल' असे ब्रम्ह्देव म्हणाले. सर्व देव पृथ्वीप्रदक्षिणेला निघाले परंतु श्रीगणेशाने आपल्या माता-पित्यांना आसनावर बसवून प्रदक्षिणा घातली. माता-पित्याचे स्थान पृथ्वीमोलाचे असल्याने ब्रम्हदेवाने श्रीगणेशाला अग्रपूजेचा सन्मान दिला.
   श्रीगणेश मूर्ती :- आकार चरण युगुल| उकार उदर विशाल|| मकार महामंडल| मस्तकाकारे|| श्री ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीगणेशाला ओंकार स्वरुप व शब्द ब्रम्हरूप म्हटले आहे.
१. सोंड :- जमिनीवर पडलेली बारीक सुईसुद्धा हत्तीची सोंड उचलून घेते. ' जे चांगले आहे ते आत्मसात केले पाहिजे. गणपती उजव्या व डाव्या सोंडेचे असतात. उजवी सोंड म्हणजे दक्षिण दिशा 'यमाची' दिशा आहे. उजवी बाजू 'सूर्य' नाडीची आहे. यमलोकाच्या दिशेला जो तोंड देऊ शकतो तो शक्तीशाली असतो, तसेच सूर्यनाडी चालू असलेला तेजस्वी असतो. या दोन्ही आर्थि  उजव्या सोंडेचा गणपती जागृत असतो. या गणेशाची पूजा कडक सोवल्यामधे केली जाते.
. डावी सोंड वाममुखी म्हणजे उत्तर दिशा, ही शुभ व अध्यात्माला पूरक आहे, आनंददाई आहे म्हणून वाममुखी गणेश पुजेमध्ये ठेवतात.
२. शीर :- धडापासून वेगळे केलेले तेच शीर परत त्या धडाला लावून भगवान शंकर गणेशाला जिवंत करू शकले असते, परंतु त्यांनी तसे न करता हत्तीचे शीर लावले कारण हत्ती सर्व प्राण्यांत बुद्धिमान आहे. भगवान शंकराने आपल्या मुलाला बुद्धिमान केले.
३. कान :- श्री गजननाचे कान सुपासारखे मोठे आहेत. सुपातून धान्य पाखडल्यावर फोलपट बाहेर फेकले जाते व उपयुक्त धान्य सुपात राहते. माणसानेही जे ऐकवायास योग्य आहे, तेवढेच ऐकावे व बाकीचे ऐकून न ऐकल्यासारखे करावे.
४. दात :- श्रीगणेशाचा संपूर्ण दात 'श्रद्धा' तर तुटलेला दात 'संयम' असावा हा संदेश देतो.
५. हात :- गणपतीला ४-६ हात असतात. सहा हातात सहा आयुधे आहेत.  सहा हात म्हणजे सहा शास्त्रे होत.
६. मोठे पोट :- जे ऐकले ते बोलून दाखविण्याची सवय हानिकारक असते. श्रीगणेशाच्या पोटावर नागचा करगोटा असतो. नागात विष असते. टीकाकारातही टीका करण्याचे विष असते, म्हणून श्रीगणेशासारखे टीकाकारांना अलंकार म्हणून स्वीकारले पाहिजे.
७. बैठक :-  अकारण फिरतो तो दुःखी होतो म्हणून श्रीगणेशाची बैठक स्थिर आहे.
चतुर्थी व्रत:- मंगळवारी येणार्‍या अंगराकी चतुर्थीपासून चतुर्थी उपवासाचा प्रारंभ करावा. वद्यपक्षातील संकष्टी चतुर्थीचा उपवास चन्द्रोदयानंतर सोडतात. चंद्र हे मनाची तर श्रीगणेश बुद्धिदेवता आहे. जर सद्बुद्धि मनाच्या सहवासात आली तर आपले मन अचंचल होऊन 'सयुज्जता' मुक्ती प्राप्त होते. चतुर्थीला पृथ्वीभोवती Zero-G-Belt  आकर्षणरहित कडे निर्माण होते. त्यामुळे पचनक्रिया मंदावते म्हणून आरोग्याच्या दृष्टीने चतुर्थीला उपवास करणे गरजेचे आहे.

सोमवार, २९ ऑगस्ट, २०११

रेखीव सिंगापुर


   काही वर्ष म्हणजे साधारण २००८ ते २०१० या वर्षी आम्ही सेशेल्स या देशातील माहे नावाच्या बेटावर राहत होतो. सेशेल्स  हा देश सुमारे १५५ बेटांचा असून त्यापैकी माहे, लादिगनी प्राले या तीन बेटांवर मनुष्य वस्ती आहे. माहे हे त्यापैकी सर्वात मोठे बेट असून या देशाची सुमारे ९०% लोकसंख्या या बेटावर आहे. माहे बेटाची जास्तीत जास्त लांबी २६ किलोमीटर आणि महत्तम रुंदी ८किलोमीटर आहे. बेट म्हणजे ज्या प्रमाणे आपल्याला माहीत आहे की समुद्रातील पर्वतांच्या टेकड्यांचा समुद्राच्या पृष्ठभागावर दिसणारा भू भाग होय. त्यामुळे या बेटावरील काही भू भाग उंच-सखल आहे. बहुतेक रस्ते हे घाट, रस्ते आहेत. बहुतेक  इमारती या एक मजली, दोन मजली किंवा फार तर तीन मजली आहेत.
   त्यातील एक वर्षी डिसेंबरमध्ये आम्ही शिशिरच्या बहिणीकडे सिंगापुरला जायचे ठरवले. सेशेल्समधून फारच थोड्या देशांमध्ये डायरेक्ट विमानसेवा उपलब्ध आहे. सिंगपुरला जाण्यास आम्ही खूप उत्सुक होतो.

    तो दिवस उजाडला ज्या दिवशी आम्ही सिंगपुरला जाण्यास निघालो. सामान्यतः सेशेल्सच्या विमानतळावर एकावेळी फार तर २-३ च विमाने पाहावयास मिळतात. इतक्या छोट्या विमानतळावरून आमच्या 'एअर सेशेल्स' च्या छोट्या विमानाने आकाशात झेप घेतली. प्रवाशांची संख्याही फार नव्हती. आम्ही दुसर्‍या देवशी पहाटे सिंगपुरच्या भव्य-दिव्य विमानतळावर पोहोचलो. त्या विमानतळावर एकाच वेळी सुमारे २०-२५ विमाने पाहावयास मिळाली. अनेक देशांच्या एअरलान्सची विमाने सिंगपुरला येत-जात असतात. तेथून बाहेर पडल्यावर उंच-उंच गगनचुंबी इमारती पाहून तर आम्ही थक्क  झालो. कारण सेशेल्स मध्ये अशा प्रकारच्या इमारती नाहीत. अशा गगनचुंबी इमारती पाहण्याची डोळ्याना सवयच राहिली नव्हती. फरा तर टी. व्ही. वर अशी दृष्य पहिली होती. हे सर्व दृष्य बघत बघत आम्ही घरी पोहोचलो. इथे बहुतेक इमारतींच्या खाली असलेली लहान मुलांच्या खेळण्याची (घसरगुंदी, झुले, जंगलजिम इ.) सोय पाहून तर आम्हाला खूपच गंमत वाटली.

    दुसर्‍या दिवसापासून सिंगापुर पाहायचा प्लान शिशिरने(माझे पती) तयार केला. बहुतेक ठिकाणे ही आमच्या निवासस्थानापासून दूर असल्याने त्या ठिकाणी आम्हाला लोकालणे जावे लागणार होते. सेशेल्स देशामध्ये ट्रेन्स् नाहीत. त्यामुळे ट्रेंचा प्रवास हे तर आरुशसाठी (माझा मुलगा)  एक अप्रूपाच होते. सर्व प्रथम आम्ही तिथील प्रसिद्ध प्राणी संग्रहलयात गेलो. सेशेल्स मध्ये कुत्रे, मांजरी, गाय, बैल आणि प्रचंड मोठी कासवे याखेरीज इतर प्राणी पाहावयास मिळत नाहीत. पक्षी मात्र भरपूर आहेत. केवळ चित्रात पाहायला मिळालेले अनेक प्राणी प्रत्यक्ष पाहाताना ची. आरुशच्या शंकानी आम्हाला भांडवून टाकले.
   प्राणी संग्रहलयनंतर पक्षी संग्रहालय, सायन्स सेंटर पाहून आम्ही स्नो सिटी पाहावयास गेलो. स्नो सिटी खूपच छान आहे. सेशेल्स आणि सिंगापुर हे दोन्ही विषुववृत्ताच्या खूपच जवळ आहेत. दोन्ही स्थाने उष्ण कटिबंधात जवळ जवळ मधल्या पटट्यात आहेत. सेशेल्स मध्ये तर बर्फ फक्त फ्रीजमध्ये बघायला मिळतो. स्नो सिटी आतल्या बाजूने पूर्णपणे बर्फाची बनविलेली आहे. प्रवेश करतानाच आपल्याला गमबूट, मोठे जेकिट, हातमोजे, कानटोपी असे सर्व दिले जाते. ते घालून आत जायचे आणि बर्फात मनसोक्त खेळायचे.
   तेथील मत्स्यालय तर खूपच मोठे आहे. ते पाहाताना तर आपण स्वतःला विसरूनच जातो. या मत्स्यालयात आम्हाला जैवीजल संपत्तीची खूपच विविधता पाहावयास मिळाली.
   शिवाय सिगापूरचे प्रसिद्ध 'सॅंटोसा आयलंड' पाहायला एक्क पूर्ण दिवस अपूरच पडतो. तिथे अनेक प्रकारच्या राईड्स करण्यात वेळ कसा जातो ते समजत नाही. सायंकाळी पाहावयास मिळणारा 'sound and light'  शो तर फारच विलोभनीय आहे. त्याचे वर्णन शब्दात करणे तर फारच अवघड आहे. संगीतवर नाचणारे फवारे तर फारच मनोहरी आहेत. या सर्व चित्तकर्षक आणि मनोरंजनात्मक योजनांचा मेंटेनंस ठेवणे हे ही कठीण आव्हान आहे. पण येथे स्वच्छतेचे ही चांगले भान ठेवलेले आढळते.
    या देशात प्रत्येक स्टेशनवर आणि बस स्टॅंडवर नकाशे आणि जागेची माहिती रेखीवपणे दिलेली असल्याने ती माहिती पर्याटकाशी चांगला संवाद प्रस्थापित करू शकते. चौकशीचे फारसे प्रसंग येत नाहीत. आणि काही शोधण्यास वेळ वाया जात नाही.
   हे सर्व पाहून झाल्यावर आम्ही तेथील विमानतळावर देखील मनसोक्त फिरलो. ख्रिसमसचे दिवस असल्याने भरपूर रोषणाई पाहावयास मिळाली. तिथील सर्व आठवणी मनात साचवून आणि काही सुंदर दृश्‍ये आमच्या camera मध्ये बंदिस्त करून आम्ही सुमारे एक आठवड्याचे आमचे पर्यटन संपवून सेशेल्सच्या भातुकलीच्या खेळतल्या सारख्या चिमुकल्या विमानतळावर परतलो.

शनिवार, २७ ऑगस्ट, २०११

श्रावण अमावस्या


श्रावण वद्य अमावस्येला बैलपोळा, मात्रुदिन या सणांचे आयोजन केले जाते.
१. पोळा:- बलिवर्द या संस्कृत शब्दापासुन 'बैल' हा शब्द निर्माण झाला. वृषभ, नंदी, बसब, गोपुत्र, कृषिमित्र, शिववाहन या नावाने ज्ञात असलेला बैल  प्रत्येक गावातील शिवमंदिरात असतो. या दिवशी शेतकरी बैलाला नदीवर नेऊन आंघोळ घालून, अलंकार घालून मिरवणूक काढतो. घरी आल्यावर पूजा करून पुरणपोळी खाउ घालतो. या दिवशी बैलाला काम करून दिले जात नाही.

मातृदिन:- बन्दिग्रुहात असलेल्या देवकिने गोकुळात यशोदेकडे राहणार्‍या गोपाळ कृष्णाच्या सौख्यासाठी हे व्रत केले होते. तेव्हापासून आपल्या मुलाच्या सौख्यासाठी प्रत्येक माता हे व्रत करते. या दिवशी आई आपल्या मुलाला मागे उभे करून मुलाच्या डोक्यावर अक्षता टाकून 'अतित कोण?' असे विचारते तेव्हा " अतित मी आहे" असे मुलाने म्हटल्यावर आई पुराणच्या पुर्‍या, घावल्याची खीर अ निरंजनसहित ते वाण आपल्या मुलाला देते. या दिवशी आईला नवीन वस्त्र देऊन तिचा सन्मान करण्याची प्रथा आहे.

शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०११

राखी पौर्णिमा


येन बद्धो बळीराजा दानवेंद्रो महबळ: || तेन त्वां अनुबंधनामी रक्षे मा चल मा चल ||

Rakhi    या मंत्राचा उच्चार करून बहीण भावाच्या उजव्या हातात 'भावाने आपले रक्षण करावे' या सदभावनेने राखी बांधते. रक्षाबंधनाचा सण अनदिकाळपासून चालत आलेला आहे. १. असुरांबरोबर युद्ध करताना आत्म्विश्वास गमाविलेल्या इंद्राला इंद्रनीने श्रावण पौर्णिमेला राखी बांधली, त्यामुळे त्याला आत्मविश्वास आला व त्याने असुरांचा पराभव केला. त्या मंगल घटनेची स्मृति म्हणून हा रक्षबांधनाचा सण संपन्न केला जातो. २. कौरव पांडव युद्धात चक्रव्यूह भेदण्यासाठी जेव्हा अभिमन्यू निघाला तेव्हा कुंतिने त्याला राखी बांधली असा महाभारतात उल्लेख आहे. अशाच प्रकारे आपल्या इतिहासात काही उल्लेख आढळतात.
    रक्षबांधनाच्या दिवशी श्रावण पौर्णिमा असते. या दिवशी सागराची पूजा केली जाते. अक्षय तृतीयेला उचंबळणारा सागर सागर श्रावण पौर्णिमेला शांत होतो, अशी कोळयांची श्रद्धा आहे. आपल्या या सागर बंधुने मासे पकडण्यास सागारात गेलेल्या आपल्या पतीचे रक्षण करावे, म्हणून कोळयांच्या महिला सागारात राखी सोडतात. आणि कोळी लोकं सागरपूजन करून श्रीफळ अर्पण करतात.

सेशेल्समधील भारतीय सणवार




      'सेशेल्स' हा देश आफ्रिका खंडामध्ये मॉरिशासच्या उत्तरेला आहे. हा देश विषुववृत्ताच्याजवळ अंश दक्षिण ते अंश दक्षिण या अक्षांशाच्या दरम्यान आहे. 'सेशेल्स' या देशात माझे पती तेव्हाचे लेफ्टनंट कमांडर शिशिर दीक्षित यांची बदली त्या देशाच्या 'तट रक्षक दलाचे'सल्लागार म्हणून झाली. तर तिथे कसे जायचे? हा देश कुठे आहे? असे सगळे प्रश्न सोडवता-सोडवता आम्ही त्या निसर्ग सौंदर्याने संपन्न असलेल्या देशात जाउन पोहोचलो.
    तेथे जाउन पोहोचल्यावर सुरुवातीला स्थिर स्थावर होण्यात वेळ गेला. रोजच्या घरात लागणार्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाहेर पडलो. खरेदीसाठी ज्या दुकानांमध्ये आम्ही गेलो, त्यातील बर्याच दुकानांमध्ये चक्क भारतीय पद्धतीची साडी नेसलेली आणि कपाळाला छान कुंकू लावलेली एक तरी स्त्री दुकानदार म्हणून तेथे आढळली. त्याना हिंदी किंवा इंग्रजी भाषा समजत नव्हती फारशी. त्यांची स्थानिक भाषा 'क्रेओल' आहे. त्यांच्यापैकी काही जानींची मातृभाषा तामिळ, तेलगु, मल्ल्यालम किंवा कानडी आहे. त्या भाषेत त्या तुटक-तुटकपणे बोलू शकतात किंवा समजावून घेऊ शकतात. त्यांचे कुटुंबीय हे आता सेशेल्स देशात स्थायिक झालेले भारतीय लोक. भारताच्या दक्षिणेकडील राज्यांमधील काही लोक फार वर्षांपूर्वी तेथे गेलेले असावेत.
    या देशाच्या मध्यवस्तीत दाक्षिणात्य शैलिचे भव्य आणि सुंदर कोरीव काम असलेले एक गणपती मंदिर आहे. या मंदिरात आपले विविध भारतीय सण साजरे कीक जातात. दर महिन्याच्या संकष्टी चतूरथीला या मंदिरात यज्ञ होत असतात. देवाची आरती सनाई-चौघद्यांच्या घोषात होते. देवाला दुधाने स्नान घातले जाते चांदनाचा लेप केला जातो. तसेच मंदिराची प्रदक्षिणा वाद्यवृंदानच्या साथ-संगतीने होते. गणपती अथर्वशीर्षाचे सहस्त्रावर्तनही होते. मंदिरात सर्वाना महाप्रसादाचे भोजनही दिले जाते. 
    शिवाय या मंदिरात विविध सण देखील साजरे केले जातात. आपल्या हिंदू कॅलेंडर प्रमाणे सगळे सण इथे साजरे होतात. गणपती उत्सवात विविध उपक्रम देखील हाती घेतले जातात. लहान मुलांपासून मोठ्या पुरूष-स्त्रियांसाठी कार्यक्रम बसवले जातात. त्यात कोणाला सहभागी व्हायचे असेल तर प्रोत्साहन दिले जाते. प्रत्येकाच्या कला-गुणांना योग्य तो वाव दिला जातो. नवरात्र उत्सव' हा नउ दिवसांचा उत्सवही या मंदिरात साजरा होतो. त्याची सांगता विजयादशमीला होते. त्या काळात त्या मंदिरात एका बाजूला देवीची मोठी मूर्ती स्थापन केली जाते. तिला दररोज विविध रूपे देण्यात येतात. अनेक स्त्रिया त्या निमित्ताने मंदिरात एकत्र येतात. आपल्या समोर एक मोठी समई तेवत ठेऊन तिची पूजा करतात. तेथे ललिता- सहस्त्र नामाचे श्लोक म्हटले जातात. देवीच्या निरनिराळ्या आरत्या होतात. त्यानंतर मंदिराच्या मंडळामार्फत तेथे जमलेल्या सर्व स्त्रियांची खणा-नारळाने ओटी भरली जाते. अष्टमीच्या दिवशी मंदिरात जमलेल्या सर्व लहान बालकांचे विविध गुण दर्शनाचे कार्यक्रम ठेवले जातात. त्याना बक्षिसे प्रमाणपत्रे दिली जातात. त्या दिवशी स्त्रियांची ओटी भरताना साडी देऊन ओटी भरली जाते. त्या उत्सवात मंदिरात रोजच प्रत्यकेला महा प्रसाद दिला जातो.ज्याप्रमाणे मंदिरात हा उत्सव सार्वजानिकपणे साजरा केला जातो, त्याप्रमाणे घरोघरी व्यक्तिगत आणि कौटुंबिक स्तरावरही हा सण साजरा केला जातो. त्यांची छोटी-छोटी महिला मंडळे आहेत. प्रत्येक भारतीय कुटुंबाच्या घरी नवरात्रीचा एक दिवस निश्चित केलेला असतो. त्या दिवशी जवळपासच्या मंडळातील स्त्रियांना घरी बोलाविले जाते. त्या घरी देवीची मूर्ती समोर ठेऊन, देवीचे श्लोक आणि आरत्या म्हणतात. त्यानंतर प्रत्यकीला प्रसात देऊन तिची ओटी त्या घरातील स्त्री भरते.
   त्या देशात काही गुजराती, बंगाली, आणि विविध भाषिक राज्यांमधील कुटुंबे ही आहेत. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने हा सण साजरा करतो. गुजराती कुटुंबातील बरेच लोकं बांधकाम व्यवसायात आहेत. त्यानी त्यांच्या परिसरात एक 'स्वामी नारायण मंदिर' बनवले आहे. त्या मंदिराच्या प्रांगण मध्ये मंडप घालून तेथे रोज आधी आरती करतात. मग तिथे देखील महप्रसादाचा कार्यक्रम असतो. आणि मग त्या नंतर ते सर्व मिळून गरबा किंवा दांडिया खेळतात.
   बंगाली लोकांमध्ये दुर्गा-पूजेचे विशेष महत्व आहे. अष्टमी - नवमीला तर ते एका मोठ्या हॉल मध्ये देवीची मूर्ती स्थापन करतात. संपूर्ण सोवल्यात देवीची पूजा होते. मग महा-आरती होते. तिथे ही प्रसाद वाटप होऊन मग विविध संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यात सर्व आबाल वृद्धांना आपले कला गुण सदर करण्याची संधी दिली जाते. त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून आकर्षक प्रमाणपत्रे ही दिली जातातसंपूर्ण उत्साहात विविध प्रकारे सण हे या देशात साजरे केले जातात.
     शिवाय तेथील लोकांमधील उत्साह पाहून आपण भारता बाहेर आहोत असे वाटत नाही. आपले सणवार उत्सव बाहेरच्या देशात स्थायिक झालेले आपले भारतीय लोक परंपरागतपणे पार पाडत आहेत, हे अनुभवून आपल्या देशाचा आणि येथील परंपरांचा अभिमान वाटतो.
    

बुधवार, ३ ऑगस्ट, २०११

नागपंचमी

अनंतम वासुकीम शेषाम् पद्यनाभम च कम्बलम|| शन्खपलम धृतराष्ट्रं तक्षकं कालियाम तथा||१||
येतानि नवनामानी नागानाम च महात्मनाम|| सायंकाले पठेन नित्यम प्रात: काले विशेषत: ||
तस्य विषभयम नासती सर्वत्र विजयी भवेत||२||

सर्पाची वर्णन वेदापासून ते पुराणापर्यंत सर्व ग्रंथात आहे. महाभारटकाळात 'नाग' नावाची जात होती. त्यांचा 'आर्य' लोकांशी संघर्ष होत असे अशी कथा आहे. इंद्रप्रस्तनगरी स्थापन करण्यासाठी कृष्णर्जूनाच्या विनंतीवरुन अग्निने खांडवावन जाळाले. त्यात नागांच्या अनेक जाती जाळून गेल्या. त्यातून 'तक्षक' नावाचा नाग वाचला. तसेच गोकुळातील यमुनेच्या डोहाट राहणार्‍या काळियाच्या विषामुळे अनेक गाई, गोप मेल्याने श्री गोपाल कृष्णाने कालियाला शिक्षा करून यमुनेतुन हाकलून दिले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. वरील घटनांची स्मृती म्हणून नागपंचमीचा सण संपन्न केला जातो.
नागाच्या नावामध्ये 'शेष' व 'अनंत' हे दोन नावे अर्थपूर्ण आहेत. माणसाच्या जीवनाचा 'शेष,अनंत' असावा. साप ही राष्ट्रीय संम्पत्ती असून त्याचे संरक्षण करणे ही आपली गरज आहे. साप शेतकरयचा मित्र आहे शेतीचे नुकसान करणारे किमान २५० उंदीर धामान साप वर्षात खातो. तर 'ओलिव्ह किल बॅक' या पानसापाची पिल्ले डासांच्या अळयावर जगतात. साप हा भित्रा व निरुपदृवी प्राणी असून साप मधुर संगीतमुळे डुलतो हे चुकीचे आहे. कारण त्याला कान नसल्याने ऐकवायास येत नाही. साप दूध पितो हेही चुकीचे आहे, कारण सापाची जीभ बारीक व फाटे फुटलेली असते त्यामुळे त्याला दूध शोषून घेता येत नाही. नागपंचमिला गारुद्याच्या नागाच्या पुजेऐवजी भिंतीवर वा कागदावर नागनागिणीचे चित्र काढून त्याची पूजा करावी.