सोमवार, २० जुलै, २०१५

एका प्रवासाची गोष्ट

         


       माझे पती कमांडर शिशिर दीक्षित हे सेशेल्स या देशाचे नौसेनेचे सल्लागार म्हणून २००८-२०१० या काळात तिथले काम पाहत होते. त्यावेळी मी आणि माझा मुलगा असे आम्ही सर्व बरोबर राहत होतो. हे आफ्रिका खंडाच्या बाहेरच्या बाजूस बेट आहे. अतिशय निसर्गरम्य अशी ११५ बेट आहेत. त्यापैकी काही बेटांवरच वस्ती आहे.
          तर एक दिवशी आम्हाला शिडाच्या बोटीवर प्रवास करायची संधी मिळाली. हा अनुभव आम्हा सर्वांसाठी पहिल्यांदाच होता. या शिडाच्या बोटीत आम्ही एक पूर्ण दिवस राहणार होतो. क्रेओल टूरिझम तर्फे हे आयोजित केले होते. खाणं- पिणं त्यांच्याकडुनच होते. सकाळी लवकर जाऊन संध्याकाळी सूर्यास्तनंतर आम्ही परत येणार होतो. दिवसभर विविध कसरती आम्ही करणार होतो. आमच्या बरोबर इतर देखील काही प्रवासी होते. या बोतीतून निघताना ती कशी सुरू होते, शिवाय त्या शिडाचे पडदे कसे उघले जातात, हे दृष्य पाहण्यासारखे होते.
          या बोटीने आम्ही वलसा घालून बेटाच्या दुसर्‍या बाजूला गेलो. तिथे ती समुद्रात थांबली. आणि आता पुते काय करायचे हे ऐकायला आम्ही उत्सुक होतो. तेव्हा आम्हाला कळले की अजुन एका छोट्या होडीने आम्ही समुद्रात जाणार आहोत. आमच्या बरोबर त्यांनी स्नोर्क्लिन्गचे समान दिले. स्नोर्क्लिन्ग कसे करायचे या विषयी सूचं देखील दिल्या. ती होडी अथांग समुद्रात थांबली आणि आम्हाला उतरायला सांगितले. हा खरोखर वेगळा अनुभव होता. जितके ऐकायला आणि वाचायला हे सर्व मजेशीर वाटते, त्याहीपेक्षा प्रत्यक्ष अनुभव अवघड होता. पाण्यात उडी मारताना मनातली धाकधुक सांगायला नकोच. उडी मारल्यावर लगेच मी शिशिरला पकडले. आता पाण्याखाली जाऊन तिथले जग पाहायचे होते. एक दोन वेळा पाण्यात आत गेल्यावर आणि पाण्याखालची अनोखी दुनिया पाहून शिशिर्चा हात कधी सुटला हे कळलेच नाही. आणि मग भीती पण कुठे पळून गेली. खरच पाण्याखालचे जग वेगळेच असते. त्यात अनेक विविध रंगाचे लहान-मोठे मासे होते. आपले लक्ष सहजपणे वेधून घेत होते. काही मोठी मोठी कसावं देखील होती. भरपूर पाणवनस्पती होती. तसेच अनेक जिवंत आणि मृत कोरल्स पण पाहायला मिळाले. आपल्या भोवती हे माशांचे फिरणे मजेशीर वाटत होते. आपण स्वप्नात आहोत की सत्यात हे काळात नव्ह्ते.य आगळ्या-वेगळ्या जगातून बाहेर यायची इच्छाच नव्हती. ज्यावेळी आऋुश देखील पाण्यात उतरला आणि त्याने देखील काही काळ या अनोख्या जाचा अनुभव घेतला ,त्यावेळी छान वाटले. तो जेमतेम पाच वर्षाचा होता.
          मग आम्ही सगळे पाण्यावर आलो आणि आमच्या त्या शिडाच्या होडित दुपारच्या जेवणासाठी एकत्र आलो. प्रत्यक जन आपापला अनुभव सांगण्यात अगदी गुंग होऊन गेलो होतो. संध्याकाळी परत त्या बोतीतून बेटाच्या दुसर्‍या बाजूस जाऊन पोहोचलो. पण मन मात्र तिथेच त्य पाण्याखालच्या वेगळ्या जगात त्या माश्यांच्या भोवती पोहत होते.


सौ. अर्चना दीक्षित   

सोमवार, २५ मे, २०१५

कट्टा गँग

                                         Displaying IMG-20150810-WA0002.jpg
  
          आजकालच्या या फेसबुक व्हॉटसएपच्या जगात कोणाला वेळ आहे, कट्यावर बसायला. पण असच अगदी नाही हं. या नवीन टेक्नॉलॉजीच्या जगात आम्ही कट्टा संस्कृती अजूनही टिकावली आहे. आमचा व्हॉटसअप वर "TTM Katta" नावाचा एक ग्रूप आहे. पडला ना प्रश्न TTM म्हणजे काय असा? तर याचा अर्थ 'Travel and Tourism Management'.
          याची सुरूवात झाली सुमारे १९९५ या काळात. एच. पी. टी. आर्ट्स कॉलेजमध्ये पहिल्यांदा हा विषय सुरू झाला. आमचा ३० जणांचा मोठा ग्रूप होता. त्यावेळी आम्ही लेक्चर झाल्यावर काही काळ या कट्यावर बसायचो. तिथे बसून कधी नवीन नवीन टूरिझम प्रोजेक्ट विषयी चर्चा करायचो, तर कधी आम्हीच एखादी टूर देखील ऑर्गनाइज़ करायचो. त्या कट्यावरच्या आठवणी काही वेगळ्याच आहेत. बर्‍याचदा या कट्यावर बसून आम्ही परीक्षेच्या काळात अभ्यास देखील करायचो.
          पुढे सर्वजण आप-आपल्या आयुष्यात गुंतून गेले. पण आता या व्हॉटसअप वर आम्ही एक ग्रूप बनविला आहे, 'TTM KATTA' नावाचा. त्या निमित्ताने आम्ही पुन्हा सर्वजण एकत्र आलो आहोत. आणि रोज संध्याकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या व्हॉटसअप रूपी कट्यावर भेटतो. आणि अक्षरश: कट्यावर गप्पा माराव्या तशा टप्पा मारुन पुन्हा आपल्या कामाला लागतो. कधी कोणाचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस देखील साजरा करतो. त्यामुळे पुन्हा एकदा कॉलेजमध्ये गेल्यासारखे वाटते.

सोमवार, ९ फेब्रुवारी, २०१५

यांना आपलेसे करून पहा

           माझं लग्न नौसेनेमधील अधिकारी शिशिर दीक्षित यांच्याशी झाले. हे नौसेनेतील वैवाहिक जीवन मला समजून घ्यायचे होते. त्यामुळे सुरुवातीला आपण नोकरी करायची नाही असे मी ठरवले होते. पण घरी नुसते बसणे मला अवघड होते. त्याच काळात आमच्या नौसेनेची मतिमंद मुलांची शाळा आहे. त्याची जाहिरात आली की त्यांना एका सहाय्यक शिक्षकाची गरज आहे. त्यावेळी आम्ही विशाखापट्टनंला राहत होतो. मे लगेच त्यांना फोन केला. माझी याठिकाणी विनामूल्य काम करायची तयारी दाखवली. त्यांनी सांगितले की मी आधी ते शाळा पाहावी, तिथले वातावरण पहावे. आणि जर मला ठीक वाटले तरच मी तिथे काम करावे.
          त्याप्रमाणे मी त्या शाळेत गेले. पहिल्या दिवशी साहजिकच सर्व काही नवीन असल्याने माहीत नव्हते, नेमके काय करायचे. पण त्या दिवशी एवढे मात्र नक्की ठरविले की आपण इथे काम करायचे. या मुलांसाठी काही तरी नक्की करायचे. मी रोज जायला लागले. खरोखर अशा मुलांना शिकवणे, संभाळने सोप्पी गोष्ट नाही. आपल्या देखील मनावर ताबा आणि खूप संयम ठेवावा लागतो. त्यांना एकाच गोष्ट अनेकदा शिकवावी लागते. तेव्हा ती त्यांच्या लक्षात राहते. त्यात काही मुलांची आकलन क्षमता थोडी ठीक असते, पण काही मुलांना साधी गोष्ट समजून सांगतांना खूप वेळ देखील लागतो. पण आपला संयम न जाउ देता त्याना दरवेळी तितक्याच उत्साहाने त्याच त्याच गोष्टी समजावून सांगायच्या असतात. इतर मुलानपेक्षा ते काही वेगळे नाहीत, असा विश्वास त्यांच्यात निर्माण करायचा असतो.
          त्यांच्याकडून विविध उपक्रम करवून त्यांच्यामधील आत्मविश्वास वाढवण्याचे काम करायचे असते. हे सर्व सोप्पे नव्हते. पण अशक्य देखील नव्हते. थोडे अवघड होते एवढेच. मी रोज तिथे जायला लागले. त्या सर्वांमध्ये स्वतःला गुंतवून घेत होते. त्या मुलांना समजून घ्यायचा प्रयत्न करत होते. त्यामधून काही मुलांमध्ये थोडी जरी सकारात्मक प्रगती दिसून आली की खरोखर मानसिक समाधान वाटायचे. आपल्या हातून नक्कीच खूप चांगले कार्य होत आहे असा एक विश्वास निर्माण व्हायचा. नवीन गाणी, नवीन उपक्रम त्यावेळी ते स्वतः सहभागी होऊन करायला लागल्यावर कित्येकदा डोळे भरून यायचे. खरोखर खूपच वेगळे जग होते हे. असे कार्य मे जवळ जवळ दोन वर्ष केले. पण पुढे बदली झाल्याने मी हे पुढे चालू ठेऊ शकले नाही.
          पण एवढे मात्र नक्की वाटते, आपण या समाजातील एक भाग आहोत. त्यामुळे कोणत्या न कोणत्या स्वरुपात आपणही या समाजासाठी काही तरी करावे, असे मात्र खरोखर मनापासून वाटते. आपला थोडा वेळ नक्कीच अशाप्रकारच्या चांगल्या कामासाठी द्यावा.
सौ. अर्चना दीक्षित

रविवार, ४ जानेवारी, २०१५

अनुभव

                                                  अहो वर्तमानात जगायचं

 

             माझे पती, कमांडर शिशिर दीक्षित, मुंबईत नौसेना अधिकारी आहेत. त्यांची नौसेनेमध्ये असल्याने वारंवार बदली होत असते. त्यामुळे त्यांच्याबरोबर मी आणि माझा मुलगा देखील जिथे जावं लागेल तिथे जात असतो. आम्ही पण या आयुष्याचा स्वीकार केला आहे.
            असंच सध्या मुंबईत असल्याने इथल्या वातावरणाशी जुळवून घेत आहोत. माझ्या मुलाला (आऋुशला) क्रिकेटची खूप आवड. पण कॉलनी मधल्या इतर मुलांना इतर खेळांची आवड. मग काय करावं, असा माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला. त्याला अनेक प्रकारे समजाविण्याचा प्रयत्न केला. इतर खेळ खेळावे असा. पण त्याला काही केल्या हे पटेना. मला मात्र वाटत होते, की याला इतर कुठे क्रिकेट कोचिंग लावायचे आणि बदली झाली तर... तर मधेच सोडून जावे लागेल सर्व काही.  अनेक दिवस माझ्या मनाची घालमेल सुरू होती. नवर्‍याचे काम जहाजावरचे असल्याने ते अनेकवेळा बाहेर असायचे. त्यामुळे मलाच महत्वाचे निर्णय घ्यावे लागतात.
            मग या सर्व परिस्थितीचा विचार केल्यावर मी म्हटले आपल्या मुलाचा आनंद ज्यामध्ये आहे ते आपण करायचे. म्हणून मग कोलब्याच्या जवळपास कुठे क्रिकेट कोचिंग आहे का, हे मी इंटरनेट द्वारे शोधण्यास सुरूवात केली. तर शोधता शोधता अचानक माझी नजर दिलीप वेंगसरकर अकादमी यावर गेली. लगेच फोन करून मी या कोचिंग अकादमी विषयी माहिती मिळवली. येथे कामत सर, माने सर आणि कुलकर्णी सर कोच म्हणून काम पाहतात. त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटले. त्यानी देखील मला तितक्याच उत्स्फुर्ततेने माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली. मला आणि माझ्या मुलाला योग्य मार्गदर्शन दिले. तर काय लगेच आऋुशला त्या अनुषंगाने लागणार्‍या साहित्याची खरेदी केली. हे कोचिंग रोज ३ ते ६ या वेळात चर्चगेट जवळील ओव्हल मैदानात होते. तेव्हा लगेच मे या अकादमी मध्ये आरुषचे नाव नोंदविले. मी देखील या वेळात इथेच येऊन बसते. शेवटी त्याचा आनंद तोच माझा ही आनंद हो. बदालीचे पुढेचे पुढे पाहून घेऊ. शेवटी वर्तमानात तर आनंदी आहोत, हा विचार करून मस्त वाटतं. म्हणून तर म्हणते, अहो वर्तमानात जगायचं. कालचा किंवा उद्याचा विचार करून वर्तमान का खराब करायचा? बदली होईल तेव्हा बघुयात.