गुरुवार, १७ ऑगस्ट, २०२३

मी सौंदर्यवती (१५ आपला समाज)

 काय करते आहेस? झाली का सगळे काम सकाळची? झालीस का निवांत? का अजून काही करणं बाकी आहे? तुला काय बाई, बर आहे तुझ्याकडे कामाला बाई आहे. सगळी कामं ती करत असेल. तू आपली मस्त हातावर हात ठेवून बसत असशील. आमचं तसं नाही ना. आमची कामवाली बाई कधी येते, कधी नाही येत, कधी दांड्या मारते. मग काय सगळीच कामं आम्हालाच करायला लागतात. काय सांगणार माझी बाई गेली सुट्टीवर. काय तर म्हणे, आजारी पडली. दोन दिवस येऊ नाही शकणार. मग काय तर सकाळपासून बसले दोन भांडी स्वयंपाकाचा पसारा घेऊन. उगवेल परवा असे म्हटली आहे, बघूया. या आजकालच्या बायांची ना फॅशनच झाली आहे, दर काही दिवसांनी सुट्टी घ्यायची. तुमच्याकडे होतो का हा त्रास? किंवा तिकडे आहे का ही फॅशन बायांनी सुट्टी घ्यायची? 

अगं मीना काय म्हणतेस तू? कसली फॅशन आणि कसलं काय. आणि फॅशन कशाला म्हणायचं याला. मी तिला महिन्यात ना एक दोन दिवस सुट्टी देते त्यांनाही वाटतं ग. बाहेर जावं मुलांबरोबर किंवा कुटुंबाबरोबर वेळ घालवावा. त्यांच्यासोबत फिरावे. नवीन नवीन त्यांनाही ठिकाण दाखवावी. काहीतरी चांगलं खावं प्यावं. आपण जसा आपला स्वतःचा विचार करतो. तसे त्यांचे इतर आयुष्य आहे.  मग ह्या सुट्टीची फॅशन का कसली म्हणायची? मला विचारशील तर मला तर वाटतं, त्यांना महिन्यातुन एकदा किंवा दोन दिवस सुट्टी दिली गेली पाहिजे. शेवटी ती पण माणसं. त्यांना भावना नाही का? त्यांना काही इच्छा नाही का? आपल्याला पण तर बदलत्या फॅशन प्रमाणे वागायला आवडतं जगायला आवडतं छान छान राहिला आवडतं. तसंच त्यांच्याही तर काही आवडीनिवडी आहेत. आणि का नाही ग. का नसाव्यात? त्यांनी पण आजकालच्या फॅशन प्रमाणे राहायला पाहिजे की. सुट्टीचा आनंद घेतला पाहिजे की. असं कसं म्हणून चालेल? आपण समोरच्याला समजून घेतलं ना, तर समोरचा आपल्यालाही समजून घेतो. त्याचा अगदी फायदा उचलत असतील म्हणजे गैरफायदा उचलत असतील तर ते चुकीचं. पण तो वेळ ते योग्य ठिकाणी घालवणार असतील, तर काही हरकत नाही. त्यांच्या देखील काही गरज असतात ग. हे काम झाल्यानंतर बायांना घरातला एक सदस्यच बोलून जातात. त्यांचा लगेच पगारच कट करणं मला नाही पटत नाही बाई. 

हे असे संवाद आपण वारंवार ऐकत असतो. किंवा आपणही कोणाशी करत असतो. पण खरं तर आपणही सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे.  तर काहींना सवय असते, भाजी बाजारात किंवा लोकल मार्केट म्हणतो ना आपण तिथे उगीचच भाव करायची. म्हणजे बार्गेन करायची हो. उगाचच त्या भाजी बाजारात हुज्जत घालत बसतो. भाजीवाल्याची एवढी महागच का दिली. याची क्वालिटी तशी का ती पुढची माहिती आहे, इतके कमी पैसे घेते. तिकडे गेले तर एवढ्या पैशात मिळू शकते. तू काही फारच महाग विकतेस. काही तर पैसे कमी कर नाहीतर मी नाही घेणार तुझ्याकडून पुढच्या वेळी भाजी आणि फळ पण. मी त्या पलीकडच्या दुकानातून घेत जाईन हं. या अशा प्रकारच्या संवादाची जणू फॅशन झाली आहे पण काय करणार असतात काही काही लोक अशी खरं तर ना हीच लोक जेव्हा मॉलमध्ये वगैरे जातात त्यावेळी अगदी महागाच्या दुकानातून म्हणजे ब्रांडेड गोष्टी खरेदी करण्यास त्यांना फार रस असतो बरं का पण भाजी बाजारात मात्र खूप जर घालताना बाई नाही आली म्हणून तिच्याशी हुज्जत घालताना नेहमीच आपल्याला दिसतात आणि काही लोक यातली बाकी ठिकाणी म्हणजे उगाचच समाजकार्य करताना दिसतात म्हणजे रोजच्या व्यवहारातील किंवा रोजच्या आयुष्यातील जी लोक समोर असतात त्यांना मदत करण्यापेक्षा समाजकार्य करण्यातच त्यांना फार रोज असतो खरं तर ना म्हणजे माझं अगदी पर्सनल मत बर का की रोज तुमच्या आयुष्यात येणारे लोकांनाच तुम्ही थोडी थोडी मदत केली ना म्हणजे बाईच्या भावना समजून घेणे तिची परिस्थिती समजून घेणे तिच्याशी योग्य वागणूक देणे तिला तर तेही एक समाज कार्य आपल्याच जवळच्या मदत करणं आणि नको तिथे उचलत न घालणार ते योग्य उगाचच गरज नसताना मोठ्या मोठ्या मॉल मधून किंवा ब्रॅण्डेड दुकानातून नुसतीच खरेदी करत राहण्यापेक्षा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये म्हणजे मी म्हटलं तसं छोट्या छोट्या किंवा आपल्या जवळच्या लोकांना मदत केली तर ते खरं समाजकार्य हो साधं म्हटलं तसं की आधी घरच्यांना बघा माझ्या आधीच्या लेखाप्रमाणे पण की आधी आपल्या आसपासच बघा घरच्यांना बघा म्हणजे घरच्यांच्या गरजा राहिल्या बाजूलाच आणि तिसऱ्यांच्याच भागवत आहे हे कुठलं समाजकार्य त्यापेक्षा आपल्या घरातूनच समाजकार्य सुरू करूयात ना घरच्यांच्या गरजा भागून घरच्यांच्या जवळच्या म्हणजे आज स्पष्ट लोकांच्या गरजा त्यांचे काही प्रॉब्लेम असतील तर ते समजून घेणार आणि ते सोडवणे हे खऱ्या अर्थी समाजकार्य असं मला वाटतं आता मी बरोबर आहे का चूक आहे हेही कधी कधी व्यक्तीच सापेक्ष असते ना. म्हणजे भीक मागणाऱ्याला भीक नका देऊ काय मला मान्य आहे. कारण नाहीतर त्याला तशीच फुकट खायची सवय लागेल. पण जे कष्टकरी आहेत मेहनत करणारे आहेत त्यांना त्यांचे कष्टाचा चीज होईल असा तर काही केलं गेलं पाहिजे ना.

हो मला माहिती आहे की हा लेख थोडासा आधीच्या लेखाला धरूनच आहे .पण काही हरकत नाहीये. कारण काही लोक खरोखर असंच वागतात हो. म्हणून थोडी कळकळीची विनंती की समाजकार्य करायचा आहे ना, तर आपल्या आधी घरापासून सुरू करावे. समाज कार्य करायचं असेल ना तर आपल्या घरापासून किंवा आपल्या लोकांपासून सुरुवात करावं आपल्या लोकांना दुर्लक्ष करून किंवा आपल्या समाजाशी वैर साधून, दुसऱ्या समाजाचे भलं करायचं, हे कुठलं आल्यावर समाजकार्य. काय मग तयार आहात ना नवीन फॅशन करायला?  नवीन फॅशन म्हणजे नवीन फॅशन प्रमाणे आपल्याच लोकांना आधी महत्त्व द्यायला? चला तर मग आपल्या समाजाचा कार्य करूयात.


सौ अर्चना दीक्षित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा